मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
आंबोळगड (Ambolgad) | किल्ल्याची ऊंची :  82 | ||
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : रत्नागिरी | श्रेणी : सोपी | ||
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंत गड. "मुसाकाजी" या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
आंबोळगड किल्ला आंबोळ्गड गावात समुद्रा शेजारील उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. आजमितीला खंदक बुजलेला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. चिरे एकमेकांवर रचून बनवलेली तटबंदी १० ते १५ फ़ुट उंचीची होती. आता ती ढासळल्याने ६ ते ७ फ़ुट उंचीची तटबंदी पाहाता येते. उध्वस्त प्रवेशव्दारातून गडात प्रचेश करतांना उजव्या बाजूला एक बुरुज दिसतो. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भिंत आहे . त्यापुढे बुरुज होता आता तो पूर्ण ढासळलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये म्हणून अषी रचा केलेली होती. किल्ल्यात शिरल्यावर मध्य्भागी एक वडाचे मोठे झाद आहे त्याने पूर्ण किल्ल्यावर सावली धरलेली आहे. या झाडा समोर एक तुटलेली तोफ़ पडलेली आहे. झाडामागे आत्यताकृती विहिर आहे. विहीरीच्या समोर आणि बाजूला दगडी पात्र आहेत. विहिरीच्या उजव्या बाजूला उध्वस्त वास्तूचे जोते आहे. त्या समोर समाधीचे वृंदावन आहे. याशिवाय किल्ल्यावर काही घरांची जोती पाहायला मिळतात. किल्ला फ़िरायला १० ते १५ मिनिटे लागतात. किल्ल्या पासून पुढे जाणार्या रस्त्याने सड्यावर गेल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या सड्यावरुन सागराचे दर्शन होते. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
रत्नागिरीहून पावस - आडीवरे - नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर- नाटे- आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते. रत्नागिरीहून आंबोळगडासाठी बसेस आहेत. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावर राहण्याची सोय नाही, गावातील ऋषी पर्यटनात राहाण्याची सोय होऊ शकते. | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर जेवणाची सोय नाही. नाटे येथे जेवणाची सोय होते. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पाण्याची सोय नाही. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
गावातून गडावर जाण्यासाठी ५ मिनिटे लागतात. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
Depot | Village | From Depot | From Village | km |
Rajapur | Ambolgad | 6.00 | 6.45 | 40km |
Ratnagiri | Ambolgad | 5.30 (Mumbai),6.00, 7.00. 8.00,10.30, 13.30, 17.00 (Night Hault) | 5.00, 7.30, 9.00 (Mumbai), 10.30, 12.30, 15.00, 18.00 (Mumbai) | 60 km |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) |
अग्वाडा (Aguada) | अहिवंत (Ahivant) | अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजिंठा (Ajintha Fort) |
अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अलंग (Alang) | अंमळनेर (Amalner) | अंबागड (Ambagad) | आंबोळगड (Ambolgad) |
अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अणघई (Anghai) | अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) |
अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) | अर्नाळा (Arnala) | आसावा (Asawa) |
अशेरीगड (Asherigad) | औंढा (अवंध) (Aundha) | औसा (Ausa) | अवचितगड (Avchitgad) |