<?xml version="1.0" encoding="utf-8" ?>
<?xml-stylesheet type="text/xsl" href="RSS_xslt_style.asp" version="1.0" ?>
<rss version="2.0" xmlns:WebWizForums="https://syndication.webwiz.co.uk/rss_namespace/">
 <channel>
  <title>India trekking forum - Sahyadri : किल्ले</title>
  <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  <description><![CDATA[This is an XML content feed of; India trekking forum - Sahyadri : Articles on Indian History : किल्ले]]></description>
  <copyright>Copyright (c) 2006-2013 Web Wiz Forums - All Rights Reserved.</copyright>
  <pubDate>Tue, 12 May 2026 20:00:43 +0000</pubDate>
  <lastBuildDate>Fri, 13 Jul 2012 11:31:51 +0000</lastBuildDate>
  <docs>https://blogs.law.harvard.edu/tech/rss</docs>
  <generator>Web Wiz Forums 11.03</generator>
  <ttl>360</ttl>
  <WebWizForums:feedURL>http://trekshitiz.com/discussionboard/RSS_post_feed.asp?TID=77</WebWizForums:feedURL>
  <image>
   <title><![CDATA[India trekking forum - Sahyadri]]></title>
   <url>http://trekshitiz.com/discussionboard/forum_images/web_wiz_forums.png</url>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  </image>
  <item>
   <title><![CDATA[किल्ले :   &#224;&#164;&#8224;&#224;&#164;&#170;&#224;&#164;&#163; &#224;&#164;&#8226;&#224;&#164;&#191;&#224;&#164;&#178;&#224;&#165;&#141;&#224;&#164;&#178;&#224;&#165;&#141;&#224;&#164;&#175;&#224;&#164;&#190;&#224;&#164;&#8218;&#224;&#164;&#181;&#224;&#164;&#176;...]]></title>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/_topic77_post81.html#81</link>
   <description>
    <![CDATA[<strong>Author:</strong> <a href="http://trekshitiz.com/discussionboard/member_profile.asp?PF=6">Swapnil Kelkar</a><br /><strong>Subject:</strong> 77<br /><strong>Posted:</strong> 13&nbsp;Jul&nbsp;2012 at 11:31am<br /><br /><DIV ="uior inlineBlock mlm highlightor uiStreamHide uiorRight uiorNormal"><DIV =wrap><a href="http://www.facebook.com/#" target="_blank" rel="nofollow"><SPAN =uiText><FONT size=3></FONT></SPAN></A></DIV></DIV><H6 ="uiStreamMessage uiStreamline uiStreamPassive ministoryMessage ministoryInlineMessage" -ft='"tn":"B","":1'><FONT size=3>आपण किल्ल्यांवर जातो पण मुळात हे किल्ले काबांधले असतील, त्यांचे प्रकार किती, त्यांवर आढळणाऱ्या वास्तू कोणत्या इ. ची माहिती आपण इथे घेणार आहोत.<BR><BR>किल्ल्यांची उपयुक्तता, गरज :-<BR><BR>- आता शहरांमध्ये जशी 'पोलीस चौकी' असते, त्याप्रमाणे पूर्वी किल्ल्यांचा वापर चौकी म्हणून होत असे.<BR><BR>- जमीन सपाटीपेक्षा उंचावर असल्याने संरक्षण तसेच सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवणे सुलभ होते.<BR><BR>- मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी त्याजवळ किल्ला बांधला जात असे.<BR><BR>- खजिना, रसद सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच शत्रूची फौज जवळ आल्यास महत्वाच्या व्यक्तींकरिता आश्रयस्थान म्हणून किल्ल्याचा उपयोग होत असे.<BR><BR>- परराज्यावर आक्रमण करायचे असेल तर सरहद्दी जवळचे आपल्या ताब्यातील किल्ले स्वतःच्या फौजेकरिता दारू गोळ्याची आणि रसदेची सुरक्षित कोठारे म्हणून उपयोगी पडत असत तसेच युद्ध प्रसंगी माघार घेण्याचा प्रसंग आल्यास आश्रय स्थान म्हणूनही उपयोगी पडत.<BR><BR>- एखाद्या डोंगरी किल्ल्याजवळील दुसऱ्या एखाद्या डोंगरावर तोफा चढविता येऊ नये म्हणून तो डोंगर सुद्धा तटबंदी बांधून संरक्षित केला जाई. उ.दा. पुरंदर-वज्रगड.<BR><BR>किल्ल्यांचे साधारण प्रकार :-<BR><BR>१) डोंगरी किल्ले किंवा गिरी दुर्ग :- उंच डोंगरांवर जे किल्ले बांधले जात ते 'गिरी दुर्ग'. उ.दा. रायगड, प्रतापगड.<BR><BR>२) जलदुर्ग :- चाहु बाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर बांधलेला दुर्ग म्हणजे जलदुर्ग. समुद्रीमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी जलदुर्गांचा वापर होत असे. उ.दा. सिंधुदुर्ग.<BR><BR>३) भुईकोट :- 'भुई' म्हणजे जमीन. जमिनीवर बांधलेला कोट म्हणजे भुईकोट. उ.दा. चाकण.<BR><BR>किल्ल्यावर सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या वास्तू :-<BR><BR>१) दरवाजा :- ज्याप्रमाणे घरात प्रवेश करण्यासाठी दरवाज्याचा वापर होतो, त्याप्रमाणे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दरवाज्याचा वापर होत असे. दरवाज्यांच्या बांधणीच्या प्रकारांवरून किल्ला कोणत्या काळात बांधला गेला असेल हे सांगता येते. उ.दा. गोमुखी दरवाजा बांधणी ही शिव शाहीच्या काळात वापरली गेली.<BR><BR>किल्ल्यास एका पेक्षा जास्त दरवाजे असत. 'महादरवाजा' म्हणजे मुख्य वापरातला दरवाजा तसेच 'गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा किंवा चोर दिंडी' म्हणजे संकट काळी निसटून जाण्यासाठी वापरला जाणारा दरवाजा अशी विशेषणे वापरली जात.<BR><BR>२) तटबंदी :- आपण राहतो त्या इमारतीला जशी बाहेरून भिंत असते त्याप्रमाणेच 'संरक्षक भिंत' म्हणून तटबंदी बांधली जायची.लढाई च्या काळात खालून येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी तसेच एरवी नित्य नेहमीच्या पहाऱ्या साठी तटबंदीचा वापर होत असे.<BR><BR>काही भुई कोट किल्ल्यांना दुहेरी तट असे. त्यापैकी बाहेरचा तट हा आतील तटापेक्षा उंचीने जरा कमी असे. त्यामुळे बाहेरील तट जरी शत्रूच्या ताब्यात गेला तरी आतील तटावरून बाहेरील तटावर मारा करणे सुलभ व्हावे हा हेतू. या बाहेरच्या तटाला 'शेर हाजी' म्हणत.<BR><BR>३) जंग्या :- किल्ल्यातील सैनिकांना तटावरून गोळीबार करताना आडोसा मिळावा म्हणून तटास फटी ठेवीत त्यास 'जंग्या' म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूला किल्ल्यावरून गोळीबार करणारे सैनिक नक्की किती आणि कुठे आहेत हे या मुळे समजत नसे.<BR><BR>४) बुरुज :- सामान्यतः दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंना तसेच तटबंदी मध्ये ठराविक अंतरांवर बुरुज बांधले जात.<BR><BR>तटबंदी चढून एखादा शत्रू वर येत असेल तर तटबंदीच्या पायथ्यापासून काही अंतरापर्यंतची जागा ही जन्ग्यांच्या माराच्या टप्प्यात येत नाही. यासाठी बुरुजाचा उपयोग होत असे. तसेच तोफांनी सज्ज असे बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात.<BR><BR>५) मंदिर :- आपल्या घरात जसे देवघर असते तसे किल्ल्यावरसुद्धा मंदिर बांधले जायचे. गडदेवता, गणपती, मारुती अशी अनेक मंदिरे आजही आपल्याला पाहायला मिळतात.<BR><BR>मारुती मंदिर :- 'प्रतापमारुती', 'दासमारुती' अशा रूपातील मारुतीराया आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. योद्ध्याच्या रुपात असते तो प्रतापमारुती तर हात जोडून असतो तो दासमारुती. दक्षिणाभिमुख असा प्रताप मारुती आपल्याला बऱ्याचदा गडावर पाहायला मिळतो. दक्षिण दिशा हि यमाची, वाईट प्रवृत्तींची,शक्तींची मानली जाते.त्या पासून संरक्षण म्हणून मारुती दक्षिणाभिमुख असतो. आजही आपल्या घरी दक्षिण दिशेकडील भिंतीवर मारुतीची फ्रेम असते.<BR><BR>६) पाण्याची टाकी :- गडावर पाणीपुरवठ्याच्या सोयी साठी टाकी बांधली जात.<BR><BR>७) माची :- जिथून गडावर चढून येणे सोपे असेल असे एखादे पठार किंवा सोंड किल्ल्याच्याच डोंगरावर पण किल्ल्याच्या जरा खालच्या पातळीवर असेल तर त्यालाही तटबंदी बंधित असत.यालाच माची म्हणतात. उ.दा. राजगडावरील संजीवनी माची.<BR><BR>८) बालेकिल्ला :- गडाच्या मुख्य पठारावर एखादे टेकाड असेल तर त्याला तत्बंडीने सज्ज करीत असत. याच बालेकिल्ला म्हणतात.गडावरील प्रमुख व्यक्तींची निवासाची सोय बालेकिल्ल्यावर केली जायची.<BR><BR>'बाला-इ-किल्ला' या फारसी संज्ञेचे हे अपभ्रष्ट रूप आहे. बाला म्हणजे वर,वरचा किंवा डोंगर माथ्याचा हा फारसी शब्द आहे आणि कलआ म्हणजे किल्ला हा अरबी शब्द आहे. बाला-इ-कलआ म्हणजे किल्ल्याचा वरचा भाग.<BR><BR><SPAN>९) शिलालेख :- शिला म्हणजे दगड. दगडावर लिहिलेला लेख म्हणजेच शिलालेख.मराठी,संस्कृत,पोर्तुगी</SPAN><WBR><SPAN =word_break></SPAN>ज भाषेतले शिलालेख आज कित्येक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.<BR><BR>१०) तोफा :- तोफ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल तर धातूची लांब पोकळ नळी. तोफेच्या वरील मागच्या बाजूला एक छिद्र असते यातून वात आत सोडायचे. तोफेत प्रथम दारू आणि नंतर तोफगोळा टाकायचे.वात पेटवल्यावर आतली दारू पेट घेऊन उर्जा निर्माण होते. या उर्जेत प्रचंड शक्ती असते. हि उर्जा बाहेर पडायचा प्रयत्न करते.बाहेर जाण्याच्या वाटेवर तोफगोळा असल्याने गोळा बाहेर फेकला जातो.अशा रीतीने तोफगोळा लांबवर फेकला जातो. तोफगोळ्याने पार करायचे अंतर हे तोफेचे जमिनीशी असलेल्या अंशाशी निगडीत असते. <BR><BR>'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या मध्येच दुर्गाचे महत्व अधोरेखित होते. आता हे किल्ले पडक्या अवस्थेत असले तरी इतिहासकाळात त्यांनी बजावलेली कामगिरी हि अतुलनियच आहे. शत्रूच्या माऱ्यापुढे तग धरून ताठ मानेने हे किल्ले इतिहास काळात उभे राहिले,झुंजत राहिले आणि आताही झुंजतच आहेत...कशाशी तर वाऱ्या-पावसाशी.<BR><BR>कित्येक तोफगोळ्यांचे, तलवारींचे मार त्यांनी सहन केले असतील, बंदुकीच्या गोळ्या त्यांनी छाताडावर झेलल्या असतील. आणि....आणि आताही वार झेलतच आहेत...कोणाचे ? अजून कोणी नाही तर स्वकीयांचेच.. दगडांवर आपली नावे कोरणे म्हणजे एक प्रकारे या किल्ल्यांना पोचवलेली जखमच नव्हे का ?<BR><BR>मित्रहो, जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते कि आजी आजोबांच्या अंगाखांद्यांवर जशी नातवंडे बागडतात,खेळतात तसेच आपणही या किल्ल्यांवर मनसोक्त बागडूया..बघा, हे किल्ले, हा निसर्ग आपल्यावर किती भरभरून प्रेम करतील, नातेच असे विलक्षण आहे हे !!!</FONT></H6>]]>
   </description>
   <pubDate>Fri, 13 Jul 2012 11:31:51 +0000</pubDate>
   <guid isPermaLink="true">http://trekshitiz.com/discussionboard/_topic77_post81.html#81</guid>
  </item> 
 </channel>
</rss>