<?xml version="1.0" encoding="utf-8" ?>
<?xml-stylesheet type="text/xsl" href="RSS_xslt_style.asp" version="1.0" ?>
<rss version="2.0" xmlns:WebWizForums="https://syndication.webwiz.co.uk/rss_namespace/">
 <channel>
  <title>India trekking forum - Sahyadri : Sudhagad Project</title>
  <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  <description><![CDATA[This is an XML content feed of; India trekking forum - Sahyadri : Sudhagad Project : Last 10 Posts]]></description>
  <copyright>Copyright (c) 2006-2013 Web Wiz Forums - All Rights Reserved.</copyright>
  <pubDate>Mon, 04 May 2026 08:29:49 +0000</pubDate>
  <lastBuildDate>Fri, 24 Aug 2012 17:16:03 +0000</lastBuildDate>
  <docs>https://blogs.law.harvard.edu/tech/rss</docs>
  <generator>Web Wiz Forums 11.03</generator>
  <ttl>30</ttl>
  <WebWizForums:feedURL>http://trekshitiz.com/discussionboard/RSS_topic_feed.asp?FID=11</WebWizForums:feedURL>
  <image>
   <title><![CDATA[India trekking forum - Sahyadri]]></title>
   <url>http://trekshitiz.com/discussionboard/forum_images/web_wiz_forums.png</url>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  </image>
  <item>
   <title><![CDATA[Sudhagad Project : डोंगरांनी मला काय ]]></title>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/_topic106_post125.html#125</link>
   <description>
    <![CDATA[<strong>Author:</strong> <a href="http://trekshitiz.com/discussionboard/member_profile.asp?PF=70">joshisuhas</a><br /><strong>Subject:</strong> डोंगरांनी मला काय <br /><strong>Posted:</strong> 24&nbsp;Aug&nbsp;2012 at 5:16pm<br /><br /><span ="Apple-style-span" style="font-family: arial; line-height: 25px;"><span ="Apple-style-span" style="font-size: x-large;">डोंगरांनी मला काय&nbsp;दिले ....</span></span><br><span ="Apple-style-span" style="font-family: arial; font-size: 14px; line-height: 25px;"><br></span><span ="Apple-style-span" style="font-family: arial; line-height: 25px;">निसर्गात स्वच्छंदी&nbsp;भटकायचा आनंद, साहसाची अनुभूती, इतिहासाचे भान, काहीतरी जगावेगळे करयाचा आनंद हे सारे तर दिलेच पण त्यापेक्षादेखील एक अनोखा आनंद दिला तो म्हणजे पाच्छापुरातील वाचनालयाने ....</span><br><span ="Apple-style-span" style="font-family: arial; line-height: 25px;"><span ="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br></span></span><span ="Apple-style-span" style="font-family: arial; line-height: 25px;"><span ="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;">दिनांक २६ नोव्हेंबर&nbsp;२००५&nbsp;</span></span><br><div>भर दुपारची वेळ.. &nbsp;२५- ३० गावकरी आमची वाट पाहत आहेत.. &nbsp;</div><div>१०० - १५० विद्यार्थीदेखील होते... &nbsp;</div><div>खरे तर आम्हाला उशीरच झाला होता...</div><div>आम्ही फार मोठे काही करत नव्हतो...</div><div>जे आम्हाला हे सुचले होते ते करण्याचा प्रयत्न होता तो..&nbsp;</div><div>पण त्यांच्या दृष्टीने खूप काही तरी होते..&nbsp;</div><div>आम्ही पोचणार होतो सकाळी १० वाजता. पण दिवा - सावंतवाडी रेल्वेला अपघात झाला आणि आमची वरात आमच्या एष्टीने १ वाजता&nbsp;पाच्छापुरात&nbsp;पोहचली ....</div><div>असे काय होते आमच्याकडे..&nbsp;</div><div>ज्यासाठी&nbsp;सारी मंडळी वाट पाहत होती..&nbsp;</div><div><br></div><div>आम्ही सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूरच्या शाळेत एक छोटेसे वाचनालय सुरु करणार होतो..&nbsp;</div><div><a href="http://4.bp.blogspot.com/-bTzOHD1tuL0/UDAOhGq2zpI/AAAAAAAAJFU/1u2z1-uqFh8/s1600/photo34.jpg" target="_blank" rel="nofollow"><img src="http://4.bp.blogspot.com/-bTzOHD1tuL0/UDAOhGq2zpI/AAAAAAAAJFU/1u2z1-uqFh8/s320/photo34.jpg" height="238" width="320" border="0" /></a>अमुक एवढी पुस्तके वैगरे काही अंदाज नव्हता. एक कल्पना सुचली होती आणि त्याच्या अनुषंगाने काम सुरु केले होते. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून&nbsp;सुधागडावर काम करताना जाणवले होते कि गावात देखील काहीतरी केले पाहिजे. इतिहास, गडावरील वास्तू हे सारे तर महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर पायथ्याच्या गावातील गिरीजन देखील तितकेच महत्वाचे आहेत. गावात दोन शाळा आहेत. एक प्राथमिक आणि एक माध्यमिक. माध्यमिक शाळा नुकतीच सुरु झालेली आणि विनाअनुदानित. आपण आजवर ढिगाने पुस्तके वाचली, इतिहासाची, निसर्गाची, ललित, विज्ञान, वैचारिक इ. आपली&nbsp;ऐपत होतीच&nbsp;पण&nbsp;त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे आपल्याला हाताशी अनेक वाचनालयेदेखील होती. मग असेच एक वाचनालय सुरु केले तर. पाली येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांच्याशी बोलता बोलता योजना नक्की झाली आणि पाहता पाहता वाचनालयाची संकल्पना अस्तिवात आली होती. &nbsp;एक दोन आठवड्यात आम्ही सर्वांनी मिळून चार साडेचारशे पुस्तके जमा केली होती.&nbsp;प्रसाद निकतेच्या पुढाकाराने क्षितीज ग्रुपने सुधागडवर अनेक उपक्रम सुरु केलेच होते त्यात आता आणखीन एका नव्या उपक्रमाची भर पडणार होती.&nbsp;</div><div><br></div><div>हे सारे आठवले ते परवाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी. १५ ऑगस्ट २०१२.&nbsp;</div><div>तब्बल ७ वर्षे झाली होती त्या घटनेला. मध्यंतरी दोन तीन वेळा शाळेत गेलो होतो. वाचनालयाची यादी, नवीन पुस्तके वैगरे, पण नवीन काहीच &nbsp;झाले नव्हते माझ्याकडून. &nbsp;तसेही अनेक व्यवधाने मागे लावून घेतल्यामुळे याकडे पाहणे झालेच नव्हते. त्यामुळे ठरवून परवा गेलो.&nbsp;</div><div><br></div><div>अगदी छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या कामाचे आताचे स्वरूप पाहून खरेच मनापासून आनंद होत होता.&nbsp;</div><div ="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://3.bp.blogspot.com/-99BPNweEkKo/UDAQYjCejyI/AAAAAAAAJFc/4IMHvBlHjYM/s1600/304795_394733070579759_1685033327_n.jpg" target="_blank" rel="nofollow"><img src="http://3.bp.blogspot.com/-99BPNweEkKo/UDAQYjCejyI/AAAAAAAAJFc/4IMHvBlHjYM/s320/304795_394733070579759_1685033327_n.jpg" height="245" width="320" border="0" /></a></div><div>पाच्छापुरातील अनेक गावकरी, माध्यमिक शाळेतील सारे विद्यार्थी एकत्र आले होते. आदल्या दिवशी क्षितीजच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे वाचनालयासाठी भरपूर पुस्तके जमा झाली होती. (नक्की संख्या राहुल सांगू शकेल) महत्वाचे म्हणजे हे काम पुढे चालू राहिले होते. त्या दिवशी राहुल मेश्राम आणि नंदू देवधर सोडले क्षितीजचे इतर सारेचजण माझ्यासाठी नवे होते. ही ब्लॉग पोस्ट लिहण्याचे सर्वात महत्वाचे कारण हेच आहे.</div><div><br></div><div>संस्था का हवी? &nbsp;२००५ साली आम्ही सर्वांनी मिळून हे वाचनालय क्षितीज ग्रुप आणि सेठ जे. एन. पालीवला कॉलेज एनएसएस युनिटच्या माध्यमातून सुरु केले. खरे तर गेल्या ३-४ वर्षात सुरवातीस पुढाकार घेणा-या कोणाचेच याकडे लक्ष नव्हते. तरीदेखील आज ७ वर्षानंतर त्यात अनेक नवीन पुस्तकांची भर पडत आहे. इतकेच नाही तर त्या अनुषंगाने अनेक उपक्रम सुरु आहेत. आज तर ९वी&nbsp;-१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके देखील दिली जात आहेत. &nbsp;तब्बल १५० हून अधिक. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांची&nbsp;संख्या तर १०००&nbsp; च्या आसपास पोहचली आहे. हे सारे कसे झाले तर त्याच कारण म्हणजे संस्था. तुम्ही एखादा उपक्रम जेव्हा संस्थेसाठी करता तेव्हा ती संस्थेची जबाबदारी बनते आणि आपोआपच &nbsp;संस्थेत&nbsp;येणारी पुढची पिढी तो पुढे नेते. नुसताच पुढे नेत नाही तर त्यात आपल्या परीने नाविन्यपूर्ण अशी भर घालते. संस्थेच्या कार्यास हातभार लावते. याचे पुरेपूर प्रत्यंतर मला परवाच्या दिवशी आले. सुरवातीच्या काळातील&nbsp;आम्ही कार्यकर्ते गेली काही वर्षे यात सक्रीय नसलो तरी संस्थेने आपला उपक्रम सोडला नाही. नेटाने प्रयत्न करत नवनवीन पुस्तके यात येत आहेत. इतकेच नाही तर संस्थेमार्फत अनेक स्पर्धादेखील घेतल्या जात आहेत.&nbsp;</div><div><br></div><div>परवाच्या दिवशी त्या सर्व शाळेतील मुलांच्या चेह-यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. सर्वाना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात होते. इयत्तावार प्रमाणपत्र वाटत असताना काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी नंदूला विचारले. त्याने सांगितले कि पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र शेवटी वाटणार. त्यावेळी त्या मुलांच्या चेह-यावरील आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता. आपण बक्षीस फार काही मोठे देणार नव्हतो. पण त्यांना खूप आनंद झाला होता. मी तो सारा आंनद त्या मुलांमध्ये बसून अनुभवला. खूप बरे वाटले. एक छोटासा उपक्रम कसा वाढू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण. मी क्षितीज ग्रुपचा सदस्य वैगरे म्हणून नाही सांगत पण संस्था म्हणून एखादा उपक्रम कसा पुढे न्यावा त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.&nbsp;</div><div><br></div><div>दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांचा सहभाग. गेली काही वर्षे दुर्गसंवर्धनाबद्दल बोलताना कायम या मुद्द्यावर भर देत आलोय. नेमका तोच मुद्दा साध्य करण्यासाठी वाचनालयाची सुरवात झाली होती. आज गावातील अनेक मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसत होती. त्यांना आपल्या संस्थेच्या कामाबद्दल कुतुहूल आणि कृतज्ञता होती. ग्रामस्थ&nbsp;बच्चू कडू सात वर्षापूर्वी वाचनालय सुरु करताना आपल्या बरोबर होता. आज आपले सर्व कार्यकर्ते त्याच्याच घरी उतरले होते. चहा घेताना शाळेतील एक शिक्षक आपण देत असलेल्या पुस्तकांबद्दल तसेच&nbsp;शालेय पुस्तकांबद्दल खूप आभार मानत होते. (त्यांचे मते&nbsp;शालेय&nbsp;सेटसाठी किमान ६५० रुपये खर्च करावे लागतात) . हा सारा सकारात्मक प्रतिसाद भविष्यात खूपच उपयोगी ठरणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या कामाची नोंद घेतली होती. अर्थात याचा उपयोग भविष्यात नक्की होऊ शकेल..</div><div><br></div><span ="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;">सुधागडवरील संवर्धनाच्या व पाच्छापुरातील वाचनालयाच्या कार्यरत असणा-या सर्व कार्य कर्त्यांचे अभिनंदन व&nbsp;आभार&nbsp;</span><span ="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"><div><br></div><div>..............................</div><div><br></div><div><b>जाता जाता वाचनालय सुरु करतानाच्या आठवणी:</b></div><div style="text-align: right;"><a href="http://3.bp.blogspot.com/-kuEvBlCowsw/UDAQpS4YHxI/AAAAAAAAJFk/3eqnuiwvXfw/s1600/photo41.jpg" target="_blank" rel="nofollow"><img src="http://3.bp.blogspot.com/-kuEvBlCowsw/UDAQpS4YHxI/AAAAAAAAJFk/3eqnuiwvXfw/s320/photo41.jpg" height="239" width="320" border="0" /></a></div></span><span ="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span ="Apple-style-span" style="line-height: 28px;"><br></span></span><span ="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"><div>२००५ साली जेव्हा असे वाचनालय सुरु कार्याचे ठरवले तेव्हा नेमकी कोणती आणि कशी पुस्तके घ्यावी याची माहिती नव्हती. तेव्हा अमेयने &nbsp;National बुक ट्रस्टची माहिती काढली. तेथून &nbsp;एक मोठा&nbsp; बॉक्स भरून तब्बल दोनशे&nbsp;पुस्तके आणली. (अर्थात ती घेताना मी आणि अमेय नेहमीप्रमाणे भरपूर भांडलो). पुराणिक सरांबरोबर पुण्याला जाऊन अनमोल प्रकाशन आणि इतर दुकानातून पुस्तके गोळा केली. हि सारी पुस्तके कॉलेजच्या नावाने घेतली कारण त्यांना सवलत मिळत असे. पुराणिक सरांच्या भावाने देखील मदत केली होती. &nbsp;त्याचबरोबर अनेक जणांनी यासाठी रोख तसेच पुस्तक स्वरुपात मदत केली. &nbsp;सुरवातीस घेतलेल्या सर्व पुस्तकांची रजिस्टरमध्ये नोंद पाली कॉलेजच्या ग्रंथपालानी केली होती. पाच्छापुरातील माध्यमिक शाळेतील खंडागळे गुरुजीनी सर्व पुस्तके ठेवण्यासाठी कोठून तरी एक कपाट उपलब्ध केले होते. आज हे खंडागळे सर्व शिक्षा अभियानात पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे परवा भेट नाही झाली. वाचनालय सुरु करताना शाळेने आणि गावक-यांनी जंगी कार्यक्रम केला होता. चक्क मांडव वैगरे घातला होता शाळेपुढे. आमचे अगदी हार तुरे घालून स्वागत झाले होते. त्याच वेळी गावात एनएसएसचे शिबीर सुरु होते. ती मुले दुस-या दिवशी गडावर कामाला देखील आली होती. महादरवाजाचे बरेच काम तेव्हा झाले होते. विशेष म्हणजे तेव्हा अप्पा म्हणजेच धनंजय मदन देखील उपस्थित होते.&nbsp;</div><div ="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://2.bp.blogspot.com/-Q2-bG7jZIEE/UDARIDGS5YI/AAAAAAAAJFs/t4_Qew8v6DY/s1600/photo35.jpg" target="_blank" rel="nofollow"><img src="http://2.bp.blogspot.com/-Q2-bG7jZIEE/UDARIDGS5YI/AAAAAAAAJFs/t4_Qew8v6DY/s320/photo35.jpg" height="239" width="320" border="0" /></a></div><div><br></div><div>(पुण्याहून पुस्तके घेऊन येताना खंडाळा घाटात मस्त चांदणे होते, पुराणिक सरांनी बाईकचा दिवा बंद केला आम्ही त्या नैसर्गिक प्रकाशात बराच घाट उतरलो.)&nbsp;</div><div><br></div><div>डोंगरांनी मला काय दिले याची यादी करायची झाली तर हे वाचनालय हे सर्वोच्च ठिकाणी असेल. <br></div></span>]]>
   </description>
   <pubDate>Fri, 24 Aug 2012 17:16:03 +0000</pubDate>
   <guid isPermaLink="true">http://trekshitiz.com/discussionboard/_topic106_post125.html#125</guid>
  </item> 
  <item>
   <title><![CDATA[Sudhagad Project : “ वो सात दिन “]]></title>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/_topic63_post65.html#65</link>
   <description>
    <![CDATA[<strong>Author:</strong> <a href="http://trekshitiz.com/discussionboard/member_profile.asp?PF=6">Swapnil Kelkar</a><br /><strong>Subject:</strong> “ वो सात दिन “<br /><strong>Posted:</strong> 06&nbsp;Jul&nbsp;2012 at 1:14pm<br /><br /><TABLE border=0 cellSpacing=0 cellPadding=0><T><TR><TD vAlign=top><DIV>२००५&nbsp;च्या डिसेंबर मध्ये क्षितिज तर्फे सलग&nbsp;७ दिवस गडावर माती सफाई चा कार्यक्रम आखला होता त्या निमित्त आठवडाभर मी गडावर होतो. त्यावर खालील लेख आधारित आहे…</DIV><DIV>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </DIV><DIV>&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;<strong><U> “ वो सात दिन “</U></strong></DIV><DIV><BR></DIV><DIV>क्षितिज तर्फे सुधागड&nbsp;प्रकल्प राबविला जातो. प्रकल्पाच्या बैठकीमध्ये पुढची कामे ठरवली जातात. अश्याच एका बैठकीला आम्ही जमलो होतो. तेव्हा&nbsp; महादरवाज्यातील माती सफाई चे काम चालू होते. शनिवार-रविवार जमेल तसे गडावर जाऊन माती सफाई चे काम चालायचे. बरीच चर्चा झल्यावर निष्कर्ष निघाला की एक मोठी धडक जर का या कामाला दिली तर काम पूर्ण होऊ शकते. आठवडाभर सलग काम करता येईल का यावर विचार चालू होता. गावातून मजूर आणायचे आणि इकडून जसे जमतील तशी मुले घेऊन जायची असे काहीसे साधारण ठरत होते.</DIV><DIV>गेल्या काही दिवसांपासून माझा ऑफीस मध्ये LTA घेण्याचा विचार सुरू होता. अचानक एक कल्पना सुचली,&nbsp; LTA घेऊन गडावरच का जाऊन राहू नये ? दोन्ही उद्देश साध्य होणार होते. माझा LTA सुद्धा 'claim' होणार होता आणि श्रमदानाच्या कामाला सुद्धा मदत मिळणार होती. कल्पना बोलून दाखवली..सर्वाना पसंत पडली…झाले, मोहिम नक्की झाली. कालावधी ठरला ३१ डिसेंबर २००५ ते ८ जानेवारी २००६.</DIV><DIV>मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत बैठका मागून बैठका चालू होत्या.. आठवडाभर मी किल्ल्यावर ठाण मांडून बसणार होतो..रोज ८ ते १० मजूर ठाकूरवाडीतून किल्ल्यावर येणार, दिवसभर काम करून संध्याकाळी परत खाली जाणार. कामासाठी लागणारी घमेली, फावडी, कुदळ गडावरच्या वाड्यात होती..२,३ मोबाइल चे सेट मी ठेवायचे ठरले..कारण एक बॅटरी ८ दिवस पुरली नसती आणि बॅटरी चार्जिंग चा तर संबंधच नव्हता..रोज रात्री मुंबई ला फोन करून त्या दिवशी झालेल्या कामाचा आढावा घ्यायचा आणि काही हवे नको असल्यास त्याबद्दल चर्चा करायची…रोज जमेल तसे १,२ जण डोंबिवलीहून गडावर येणार होते..त्यांच्याबरोबर काही गोष्टी हव्या असल्यास मागावायचे ठरले…मजुरांची रोजच्या जेवणाची सोय गडावरच होणार होती…त्यासाठी ठाकूरवाडीतून एक ‘कुक’ गडावर राहणार होता..गावच्या भाषेत कुक ला ‘जेवण्या’ म्हणतात..धान्याचा साठा गडावर करून ठेवायचा आणि अजुन लागणार असल्यास गावातून मागवायचे ठरले.</DIV><DIV>प्रत्यक्ष तयारी ला सुरूवात झाली..डाळ,तांदूळ,तेल, मीठ, चहा पावडर अशी यादी करून पालीला धाडली…माझे ८ दिवसांचे कपडे, प्रथमोपचाराचे सामान ई. गोष्टी सॅक मध्ये जायला लागल्या..</DIV><DIV><BR></DIV><DIV>अखेर तो दिवस आला..ठरल्याप्रमाणे आम्ही ४,५ डोकी शनिवारी गडावर पोचलो..मित्राना नवीन वर्षाच्या शुभेछा द्यायला फोन केला की त्याना आम्ही सांगायचो “ कॉलिंग फ्रॉम सुधागड सर ”. रविवारी आठवड्याभरच्या प्लॅन वरुन पुन्हा एकदा नजर मारली…डाळ, तांदूळ, मीठ, मिरची चा स्टॉक मजूर गडावर आणणार होते त्याप्रमाणे तो आला. गडावर गाई असल्यामुळे दूध भरपूर होते..सर्व काही व्यवस्थित प्लॅनिंग प्रमाणे होत होते..आता&nbsp;फक्त प्रत्यक्ष कामाला सुरूवात व्हायचा अवकाश होता…</DIV><DIV><BR></DIV><DIV>वाड्यावरून भोराई कडे जाताना गुप्त दरवाजा लागतो. या गुप्त दरवाज्यासमोर डाव्या बाजूला एक बुरूज उतरत आलेला दिसतो.. त्या बुरुजावर आम्ही जाउन आलो. पायवाटेवर चांगलाच घसारा आहे. तसेच गुप्त दरवाज्याच्या उजव्या बाजूला ‘बोकडशीलेचा पहारा’ नावाचे पहार्‍याचे ठिकाण आहे..तिकडे बुरूज आणि पाण्याचे टाके आहे.. ठाकूरवाडीतला मंगेश नावाचा मुलगा (त्याला आम्ही मंग्या म्हणाय़चो) बरोबर होता..तो होता म्हणूनच आमची ही दोन्ही ठिकाणे पाहून झाली. रविवारी संध्याकाळी मझयाबरोबेर् आलेले गड उतरले…आता गडावर मी,मंग्या आणि मावशी च होतो…</DIV><DIV><BR></DIV><DIV>सोमवार उजाडला…८ वाजता मजूर येणार होते..त्या प्रमाणे सगळे आटपून ८ पर्यंत तयार होऊन वाड्याबाहेर दगडावर बसून मजुरांची वाट पाहत होतो..पण साडे आठ झाले, ९ वाजले, १० वाजले…मजूर आलेच नाहीत..सराना फोन करून जरा चौकशी करायला सांगितले…मजूर खाली फंडच्या कामात असल्यामुळे आज येणार नव्हते..घोर निराशा झाली..सोमवार चा पहिला दिवस तसाच फुकट गेला..</DIV><DIV>मंगळवार उजाडला..पुन्हा एकदा ८ वाजता तयार होऊन दगडावर बसलो होतो..पण स्थिती कालचिच..कोणीच आले नाहीत..पुन्हा एकदा सराना फोन..समजले की आजही फंडचे काम असल्यामुळे मजूर येणार नाहीत.आम्ही थोडे वैतागलो होतो..येतो असे सांगून सुद्द्धा २ दिवस मजूर आले नाहीत..२ दिवस फुकट गेले होते..पण राग व्यक्त करून चालणार नवता कारण पुढचे ४ दिवस त्यांच्याकडुनच काम करून घ्यायचे होते...अखेर बुधवारी काम सुरू झाले..महा दरवज्यातुन बाहेर आले की वाट उतरत जाते.त्याच्या दोन्ही बाजूला खोलगट भाग आहे..पुर्वी गड जेव्हा वापरात होता तेव्हा पावसाचे पाणी वाटेवर न येता बाजूने वाहून जाण्यासाठी केलेली ती सोय होती…आता आम्ही दरवाज्यातील माती काढून या खोलगट भागात टाकणार होतो जेणेकरून जेव्हा पाउस पडेल तेव्हा पाण्याबरोबेर् ती माती वाहून जाईल…दरवाज्यापासून खाली उतारापर्यंत आम्ही&nbsp; मानवी साखळी केली..सर्वात पहिला गडी घमेली भरून पुढच्या कडे द्यायचा..पुढचा त्याच्या पुढच्याकडे आणि त्याच्या पुढचा त्याच्या पुढच्याकडे..असे करत ती माती त्या खोलगट भागात येऊन पडायची…कामाला जोर पकडू लागला होता…काम करताना आमच्या गप्पा सुद्धा मस्त चालू असायच्या..हे गडी त्यांची गाणी म्हणायचे..ते ऐकायला खूप छान वाटायचे.. पहिल्या दिवशी अंदाजे २५० ते ३०० घमेली माती निघाली होती…काम समाधानकारक नव्हते पण सुरूवात तर झाली होती..मुंबईला कामाचे ‘रिपोर्टिंग’ झले…रात्री जेवण करून झोपी गेलो…</DIV><DIV>गुरुवारी सकाळी वेळेवर मजूर आले…ठरल्याप्रमाणे डोंबिवलीहून सुद्धा कुमक येत होती..आज आम्ही १४,१५ जण होतो..त्या दिवशी मस्त काम झाले…घमेली चा आकडा ८५० ते ९०० पर्यंत गेला होता…शुक्रवारी सुद्धा चांगले काम झाले…धान्याचा स्टॉक संपत आला होता…तो मागवून घेतला…गडी लोकांचे जेवण पाहिल्यावर अवाक् व्हायला होते…आपल्या दुप्पट, तीप्पट त्यांचे जेवण असायचे...रोजचा मेनु सुद्धा मस्त असायचा..कधी&nbsp; खिचडी, कधी मस्त गरम गरम आमटी भात…दरवाज्यात पायर्‍यावर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो..तिकडेच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा कामाला सुरवात…</DIV><DIV>शुक्रवारी २ वेगळे अनुभव मिळणार होते…एका गड्याने मला विचारले की तुला रान मेवा खायचा आहे का ? म्हटल की कोनचा मेवा&nbsp; सांगा की…संध्याकाळी त्यानी 'तो' मेवा दाखवला..करड्या रंगाचा चांगला भरलेला ससा पकडला होता…हे लोक रानात ससे पकडतात आणि खाली गावात जाऊन विकतात..ससा पकडण्यासाठी फासे कसे लावतात ते सुद्धा बघायला मिळाले…त्या दिवशी पहिल्यांदी ससा खाल्ला…आवडला… …आणखी फासे लावण्यासाठी त्या दिवशी मजुरांचा मुक्काम गडावरच होता… संध्याकाळी काम झाल्यावर वाड्यात आम्ही सगळे चहा पीत बसलो होतो…तेवढ्यात मावशीचा ओरडण्याचा आवाज आला “ पडली पडली “ बाहेर येऊन पाहतो तो काय, एक गाय खड्ड्यात पडली होती…वाड्यात शिरायच्या आधी एक अरुंद असा वाटेवरच खडडा आहे…त्यात एक गाय उलटी पडली होती…तिची मान खालच्या बाजूला आणि पाय वरती होते..गाईचा श्वास जोरात चालू होता..सुटकेसाठी हात पाय झाडत होती…गाईला बाहेर कसे काढायचे ते ठरवले…मावशीकडे नायलॉन चे रोप होते…असे ठरले की हे रोप गाईच्या पायाला बांधायचे..एक जण खड्ड्यात खाली उतरून खालच्या बाजूने गाईला वर ढकलेल आणि त्याच वेळेला आम्ही रोप ने गाईला वर उचलणार..पहिला प्रयत्न अयशस्वी झाला…कारण आम्ही जेवा गाईला वर खेचायचो तेव्हा ती हात पाय झाडायची आणि त्या ज़ोरामुळे ती परत खाली जायची…अखेर अर्ध्या पाउण तासानंतर गाय बाहेर आली..चांगलाच घाम काढला होता..आम्हाला वाटत होते की गाईची मान नक्की मोडली असणार..पण बाहेर आल्यावर ती ४,५ मिनिटे तशीच उभी राहिली..आणि नंतर टूणू टूणू चालत निघून सुद्धा गेली…फक्त थोडेफार ख़रचटले होते तिला…जिवावर बेतणार होते पण थोडक्यात निभावल होत.…गडी होते म्हणूनच गाईचा जीव वाचला नाहीतर आम्हा दोघा तीघाना तिला बाहेर काढणे अशक्य होते…जणू काही तिचा जीव वाचायचा होता म्हणूनच देवाने मजुराना गडावर थांबवून घेतले होते..</DIV><DIV>शनिवार रविवार अजुन कुमक आली…ज्या मोहीमेसाठी इतके दिवस प्लॅनिंग चालले होते त्याचा शेवट आज&nbsp; झाला होता..मोहिम फत्ते झाली होती…जवळ जवळ ३००० घमेली माती काढली गेली होती…</DIV><DIV>&nbsp;</DIV><DIV>निघायची वेळ आली आणि कसे कसेच व्हायला लागले…सुटीच्या दिवसात आपण आजोळी राहायला जातो..आजी आजोबा नातवाचे भरपूर लाड करतात…निघायच्या दिवशी दोघानाही वाईट वाटते..अगदी तसेच झाले होते…वाड्यातून पाय निघत नव्हता…मावशीला समोर पाहताच टचकन डोळ्यातून पाणी आले..अर्थात दोघांच्याही…८ दिवसांची&nbsp;आमची सोबत आज संपली होती…गड उतरताना एक एक दिवस आठवत होता.. </DIV><DIV>गड उतरून खाली आलो…आठवड्याभरानतर आज पहिल्यांदी गाडीचा होर्न ऐकला होता… </DIV><DIV><BR></DIV><DIV>मावशीच आणि माझ प्रत्यक्ष नात काहीच नाही पण&nbsp;मुलाप्रमाणे तिने माझयावर प्रेम केले..वाड्याच्या बाजूच्याच घरात ती राहते..रोज सकाळी मी उठायच्या वेळेला ती गरम गरम चहा घेऊन हजर असायची.. सकाळ, संध्याकाळी आंघोळीला गरम पाणी करून द्यायची..रात्री तिच्या हातची भाकरी, चटणी, कोशिंबीर खायला मिळायची…रात्री गरम दूध द्यायची..तिने खूप खूप केले…मी स्वताहाला नशिबवान समजतो..अहो, असे प्रेम मिळायलाही भाग्य लागते आणि ते मला लाभले…</DIV><DIV><BR></DIV><DIV>या मोहीमेसाठी डोंबिवलीहून आलेली कुमक :- 1) प्रसाद निकते 2) स्वाती देसाई 3) सुजय राणे 4) संकेत गोरे 5) पराग दाबके 6) विशाल तळेकर 7) गणेश अभ्यंकर 8) पूजा दातार 9) मंदार होशिंग 10) प्रसन्न वैद्य 11) मनोज धारप..पालीहून मोहिमेचा आधार असणारे पुराणिक सर आणि बचू भूस्कुटे…या सर्वांचे खूप खूप आभार…</DIV><DIV><BR></DIV><DIV>दर वर्षी ३१ डिसेंबर&nbsp; ला या मोहिमेची आठवण येते..पुढेही येत राहील…आज उद्या पुरती नाही तर&nbsp;शेवट पर्यंत या आठवणींची सोबत राहणार आहे. विविध गड भ्रमंतीच्या भरपूर आठवणी आहेत.. कामा निमित्त सुधागडावर बर्‍याच वेळा जाणे झाले..&nbsp; पण ही सुधागड मोहिम मनाच्या एका कोपर्‍यात सदैव घर करून राहील...सुधागडा, तुझे शतशा आभार…७ दिवस तुझया संगतीत राहायला दिलेस, बागडायला दिलेस, काळजी घेतलीस या बद्दल मी तुझा कायम ऋणी राहीन..&nbsp; </DIV><DIV>&nbsp;</DIV><DIV ="post- entry-" itemprop="article">स्वप्नील केळकर.<BR>८६८९८८८७०३</DIV></TD></TR></T></TABLE>]]>
   </description>
   <pubDate>Fri, 06 Jul 2012 13:14:09 +0000</pubDate>
   <guid isPermaLink="true">http://trekshitiz.com/discussionboard/_topic63_post65.html#65</guid>
  </item> 
  <item>
   <title><![CDATA[Sudhagad Project : TreKshitiZ Sudhagad Project Introducti&#111;n ]]></title>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/trekshitiz-sudhagad-project-introduction_topic9_post9.html#9</link>
   <description>
    <![CDATA[<strong>Author:</strong> <a href="http://trekshitiz.com/discussionboard/member_profile.asp?PF=1">harshalmahajan</a><br /><strong>Subject:</strong> TreKshitiZ Sudhagad Project Introducti&#111;n <br /><strong>Posted:</strong> 11&nbsp;Jun&nbsp;2012 at 8:28am<br /><br /><iframe width="560" height="350" src="https://www.youtube-nocookie.com/embed/vyQYL0THnKs"  frameborder="0" allowfullscreen></iframe><span style="font-size:10px"><br /><br />Edited by harshalmahajan - 11&nbsp;Jun&nbsp;2012 at 8:31am</span>]]>
   </description>
   <pubDate>Mon, 11 Jun 2012 08:28:10 +0000</pubDate>
   <guid isPermaLink="true">http://trekshitiz.com/discussionboard/trekshitiz-sudhagad-project-introduction_topic9_post9.html#9</guid>
  </item> 
 </channel>
</rss>