| चिलखत | 
| Post Reply   | 
| Author | |
| amitsamant   Moderator Group     Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Topic: चिलखत Posted: 23 Feb 2014 at 1:01pm | 
|   	चिलखताची सुरुवात जाड कपड्यांनी बनलेल्या कवचांनी झाली. नंतर कपड्याची जागा चामड्याने घेतली, नंतर लोहयुगात धातूच्या छोट्या कड्यांपासून बनविलेल्या जाळीदार चिलखतास सुरुवात झाली. सुरुवातीच्या ओतिव लोखंडाच्या कड्यांची जागा नंतर पोलादी कड्यांनी घेतली नंतर तर हत्ती व घोडे यांनाही चिलखते घालण्यात येऊ लागली व ती प्रेक्षणीय असत. 	जाळीदार चिलखताच्या निर्माणात ४१ आकृतिबंध, म्हणजेच एका कडीत चार कड्या अडकविलेल्या असा आकृतिबंध जास्त प्रचलित होता. चिलखती सदर्याचे वजन अंदाजे २५ कि.ग्रॅ. इतके असे. त्यामुळे युध्दात खाली कोसळलेल्या योध्याला चिलखताच्या वजनामुळे सहजासहजी उठणे मुश्कील होत असे. संपूर्ण चिलखताचा संच असा असे; १) शिरस्त्राण:- जाळीचा जिरेटोप; पोलादी पत्र्याचा टोप, कानावर व मानेवर जाळी व नाकावर व खाली सरकणारी संरक्षण पट्टी. २) कोट:- अंगरख्याच्या आत किंवा अंगरख्याच्या बाहेरुन चिलखत वापरले जात असे. ३) पायजमा:- मांड्या, गुडघा व पाय यांचे संरक्षण करणारा पायजमा. अफजलखानाच्या भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी अंगरख्याच्या आतून कोट व डोक्यावर जिरेटोपाच्या आतून जाळीचा टोप परिधान केला होता.   Edited by amitsamant - 25 Feb 2014 at 1:07pm | |
|  | |
| Sponsored Links | |
|  | |
| Post Reply   | |
| Tweet | 
| Forum Jump | Forum Permissions  You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |