नागलाबंदर किल्ला
(Nagla bunder Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
30 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : ठाणे |
श्रेणी : सोपी |
प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्याच जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, गोमुख व नागलाबंदर हे तीन किल्ले बांधले गेले.
नागला बंदर किल्ला परिसर ही खाजगी मालमत्ता असल्याने पूर्व परवानगी शिवाय किल्ला परिसरात जाता येत नाही. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
ठाणे - बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर थांब्यावर उतरुन नागलाबंदर गावात चालत जाण्यास १० मिनीटे लागतात. नागलाबंदर गावात खाडी शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे काही अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत. ह्या टेकडीशेजारी असलेल्या दगडांच्या खाणीमुळे आणि अतोनात वाढलेल्या झुडुपांमुळे किल्ल्याच्या अवशेषांची पार रया गेलेली आहे व हे मुळ अवशेष कशाचे आहेत हे ओळखणे देखिल कठीण झाले आहे. ह्या अवशेषांची योग्यवेळी निगा न राखल्यास गोमुखकिल्ला व धारावी किल्ल्याप्रमाणे नागलाबंदर किल्लाही काळाच्या उदरात नष्ट होईल.
गोमुख किल्ला: नागला बंदर किल्ल्यापासून ४ किमी अंतरावर उल्हासखाडी एक झोकदार वळण घेते. ह्याच ठिकाणी सह्याद्रीची एक सोंड खाडीजवळ उतरते. ह्याच सोंडेवर गढीवजा गोमुख किल्ला उभा होता. आज ह्या जागी किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत. ठाणे - बोरीवली रस्त्यावर गोमुख गावात उतरुन ह्या ठिकाणी जाता येते. आज जरी किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान व उल्हासखाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
ठाणे - बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर थांब्यावर उतरुन नागलाबंदर गावात चालत जाण्यास १० मिनीटे लागतात. नागलाबंदर गावात खाडी शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे काही अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत.
|
सूचना : |
नागला बंदर किल्ला परिसर ही खाजगी मालमत्ता असल्याने पूर्व परवानगी शिवाय किल्ला परिसरात जाता येत नाही. |