नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला)

भुई किल्ले नांदेड डोंगररांग नाही
🏔️
अवघडीनुसार स्तर
सोपी
📏
समुद्रसपाटीपासून उंची
1188
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
N/A
🌤️
सर्वोत्तम काळ
वर्षभर

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
1-Pushkarni

1-Pushkarni

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

गोदावरी नदीच्या काठी वसलेले नांदेड हे प्राचीन शहर आहे. या शहरात गोदावरी नदीच्या उत्तर तटावर नंदगिरी नावाचा किल्ला होता. आज किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्यावर नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून किल्ल्याचा उरलेला भागही गिळंकृत केला आहे. किल्ल्यावरील पुष्कर्णीचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केलेले आहे.

नांदेड शहराच्या जुन्या भागातील अरब गल्लीत गोदावरीच्या पात्रा लगत उरलेले किल्ल्याचे अवशेष १०-१५ मिनिटात बघता येतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम,इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेल हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती.तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आनि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते.सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणुन प्रसिध्द होते.त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता.

कसे पोहोचावे

नांदेडचा नंदगिरी किल्ला नांदेड शहरात अरब गल्लीत आहे. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महारष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खाजगी बसेस येतात. मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने नांदेड गाठावे. नांदेडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते.

महत्त्वाची ठिकाणे

य़ा भुईकोट किल्ल्याला दोन तटबंद्या होत्या. त्यात एकूण २४ बुरुज होते. त्यापैकी १४ बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर १० बुरुज आतल्या तटबंदीत होते. त्यापैकी किल्ल्याचे ३ बुरुज आणि तटबंदी बाहेरुन दिसते. त्याच ठिकाणी नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांच्या दिशेने गेल्यावर किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत आपला प्रवेश होतो. या ठिकाणी पाण्यांच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फ़लक लावलेला आहे . पुढे गेल्यावर एक १५ फ़ूट लांब, १२ फ़ूट रुंद आणि १० फ़ूट खोल पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे काही अलिकडच्या काळात बांधलेल्या वास्तूंचे अवशेष आहेत. ते अवशेष ओलांडून डाव्या बाजूला पुढे गेल्यावर नदीच्या काठावर एक बुरुज आहे. त्यावर छत्री बांधलेली आहे. बुरुजावरुन टेहळणी करणार्‍या टेहळ्यांचे उन पावसापासून रक्षण होण्यासाठी याची रचना केलेली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत आजमितीला ८ बुरुज उरलेले आहेत.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. नांदेड गावात अनेक हॉटेल्स आहेत.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. नादेंड गावात अनेक हॉटेल्स आहेत.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

Nanded

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा